मुंबई : मुंबईच्या मालाड रेल्वे स्टेशन परिसरामध्ये मनसेचे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे आणि चार ते पाच मनसे कार्यकर्त्यांवर फेरीवाल्यांनी हल्ला केला आहे. मनसे कार्यकर्ते रेल्वे स्टेशन परिसरात फेरीवाले बसले आहेत का याची पाहणी करत होते, तेव्हा फेरीवाल्यांच्या जमावानं हल्ला केल्याची माहिती मिळत आहे. मालाड रेल्वे स्टेशन पश्चिम येथे हा हल्ला करण्यात आला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. राज ठाकरे स्वत: घटनास्थळी जाण्यासाठी निघाले होते, पण गोरेगाव पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी असल्यामुळे राज ठाकरे माघारी परतले. उद्या सकाळी रुग्णालयात जाऊन ते जखमी मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची विचारपूस करणार आहेत. दरम्यान काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी फेरीवाल्यांना दिलेल्या चिथावणीमुळे हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप मनसेनं केला आहे.