मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना मोठा थकवा जाणवू लागल्याने तात्काळ सलाईन लावण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेतकरी समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी, राजू शेट्टींनी आत्मक्लेश यात्रा काढली आहे. पुण्याहून निघालेल्या या यात्रेमध्ये सलग सात दिवस चालल्यामुळे, त्यांची प्रकृती खालावली आहे. दरम्यान मुंबईत पोहोचलेल्या राजू शेट्टींच्या प्रकृतीची मानखुर्दमध्ये डॉक्टरांनी तपासणी करुन त्यांना सलाईन लावलं. तसंच डॉक्टरांनी राजू शेट्टींना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला.


दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि खासदार अशोक चव्हाण यांनी खासदार राजू शेट्टी यांच्याशी फोनवरून चर्चा करुन, त्यांच्या तब्येतीबाबत विचारपूस केली. 


राजू शेट्टी यांनी शेतक-यांच्या प्रश्नांसंबंधी आत्मक्लेश यात्रा काढली आहे. पुण्याहून निघालेल्या या पदयात्रेमध्ये सलग सात दिवस चालल्यामुळे, राजू शेट्टींची प्रकृती खालावली आहे.