COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : MPSC भरती प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचं समोर आल्यानंतरही कारवाई होत नसल्याने विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे एमपीएससीच्या उमेदवारांनी पुणे ते मुंबई असा लाँग मार्च काढला. मात्र, हा लाँग मार्च पोलिसांनी मुंबईच्या वेशीवरच रोखला.


पोलिसांनी मुलुंड परिसरातच विद्यार्थ्यांचा लाँग मार्च रोखला असून आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं.


या घोटाळ्या प्रकरणी कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुणे ते मुंबई असा पायी लाँग मार्च काढला.