मुंबई : मध्यरेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ठाणे रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रूळाला तडा गेल्यामुळे प्रवाशांना नाहक त्रासाला समोरे जावे लागत आहे. अप जलद मार्गावरील वाहतूक उशीराने सुरू आहे. त्याचप्रमाण दुरूस्तीसाठी अधिक वेळ लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पारसिक बोगद्याजवळ रेल्वे रूळाला तडा गेला आहे. ऐन सकाळच्या वेळेस बिघाड झाल्यामुळे चाकरमान्यांकडून संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे चाकरमान्यांना निश्चित वेळी ऑफीसमध्ये पोहोचण्यास आज विलंब होणार असल्याचं चित्र दिसत आहे.