Mumbai News : गुरुवारी रात्री मुंबईतील गोरेगाव येथे असणाऱ्या समर्थ नावाच्या इमारतीतील पार्किंगला भीषण आग लागली. या दुर्घटनेतून 30 जणांना वाचवण्यात यश आलं असून 14 जण जखमी झाले. आगीत होरपळून 6 जणांचा मृत्यू झाल्याती माहिती समोर आली. आगीचं स्वरुप इतकं होतं की सुमारे 30 हून अधिक बाईक आणि 4 कार त्यात जळून खाक झाल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्राथमिक माहितीनुसार आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 10 हून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. ज्याच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली. सध्या इथं कुलिंगचं काम सुरू असून, आग कशी लागली याचा स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दल तपास घेत आहे.  


इमारतीच्या पार्किंगमध्ये आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज असून तिथं असणाऱ्या जुन्या कपड्यांनी ती आणखी धुमसत गेली. आणि काही वेळातच संपूर्ण पार्किंग लॉटसह पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यापर्यंत ही आग पोहोचली.