मुंबई : मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी आज शेकडो कार्यकर्त्यांसह उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे. 'मनाने जिंकलेली माणसं पाहिजेत. मला फोडलेली माणसं पक्षात नको. राजकारण करताना एक वृत्ती हवी असते. आम्हाला माणसं जोडणारी लोकं हवी आहेत. असं यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'शहराचा विकास आणि तरुणांसोबत काम करण्याची संधी यामुळे शिवसेनेत प्रवेश केला. कामातून शिवसेनेने लोकांची मनं जिंकली आहे. राज्यात शिवसेना वाढवण्याचं काम करणार आहे. पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जे निर्णय घेतील ते मान्य आहे. राष्ट्रवादी तोडण्याचं काम करणार नाही. अनेकांचे शिवसेनेत येण्यासाठी फोन येत आहेत. 



जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून मला त्यांना महाराष्ट्राभरात फिरवायचं आहे. असं यावेळी आदित्य ठाकरे यांनी म्हटलं.