मुंबई : पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल आणि महाराष्ट्र विधानसभेवर भगवा फडकणारच, असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी केलाय. डिसेंबरमध्ये निवडणुका घेण्याचा डाव आहे, म्हणूनच पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये होत असल्याचं उद्धव ठाकरे म्हणालेत.  काश्मीरमध्ये भाजपनं पीडीपीचा पाठिंबा काढून घेतला, त्याबद्दल अभिनंदन पण आता पाकिस्तानचा चिरडून टाका, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलंय. त्याचवेळी पंतप्रधान मोदींचे दौरे, बुलेट ट्रेन, नाणारच्या मुद्द्यावरुनही उद्धव यांनी टीका केलीय. पगडीच्या राजकारणावरुन उद्धव ठाकरेंनी शरद पवारांवरही निशाणा साधलाय.  पक्षाच्या 52 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत मुंबईत राज्यव्यापी शिबिरात उद्धव ठाकरे बोलत होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाहा उद्धव ठाकरेंचं संपूर्ण भाषण