मुंबई : मुंबईच्या बोरिवली स्टेशनवर रेल्वे अपघातात एका तरूणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महेश अत्रा असं अपघातात मृत्यू झालेल्या तरूणाचं नाव आहे. महेशने अहमदाबादला जाण्यासाठी गुजरात मेल पकडली होती.


दरम्यान, बोरिवली स्टेशनला पाण्याची बाटली घेण्यासाठी तो उतरला आणि पाण्याची बाटली घेतली. मात्र तितक्यात अचानक ट्रेन सुरू झाल्याने ट्रेन पकडण्यासाठी त्याने धाव घेतली. 


डब्ब्यात घुसण्याचा नादात त्याचा पाय घसरला आणि ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या गॅपमध्ये गेला. यात महेश अत्रा याचा दुर्दैवी मृत्यू झाला.