मुंबई: देशात नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) राबवू पाहणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विकासपुरूष नव्हेत तर विनाशपुरूष आहेत, अशी जळजळीत टीका विद्यार्थी चळवळीतील नेता उमर खालिद याने केली. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय छात्र परिषदेत तो बोलत होता. यावेळी त्याने म्हटले की, नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे देशाचे तुकडे करत आहेत. NRC हा मोदी सरकारचा हुकमी एक्का होता. मात्र, देशातील हिंदू जनताच त्याला विरोध करत आहे. त्यामुळे NRC चे नाव बदलून NRP करण्यात आले. मात्र, हा सगळा मोदी सरकारचा डाव आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर या कायद्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी उमर खालिद याने केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'आम्ही ८० टक्के आहोत, तुम्ही केवळ १८ टक्के; CAA ला विरोध करू नका'


मोदी सरकारकडून रोज खोटं बोललं जात आहे. नोटाबंदीमुळे नक्षलवाद संपला असे सरकार सांगत होते. मात्र, आता CAA मुळे नक्षलवाद पुन्हा सुरू झाल्याचे सरकार म्हणते. देशात केवळ नरेंद्र मोदी आणि अमित शहाच बुद्धिमान असल्यासारखे वातावरण निर्माण केले. मात्र, मी अमित शहा यांना आव्हान देऊ इच्छितो की, त्यांनी माझ्यावर खटला चालवून दाखवावा, असे आव्हान उमर खालिद याने दिले. 


'असदुद्दीन ओवेसींना क्रेनला उलटे टांगून त्यांची दाढी भादरून टाकेन'


दरम्यान, या कार्यक्रमात कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे आणि उमर खालिद एकाच मंचावर दिसून आले. नागरिकत्व सुधारणा कायदा, राष्ट्रीय नागरिक नोंदणी आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी याला विरोध करण्यासाठी ही छात्र परिषद आयोजित करण्यात आली होती.