मुंबई : मुंबईतील कस्तूरबा पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले तीन जणं रिक्षा मधून फिरायचे आणि सोनं घालून जात असलेल्या लोकांना रिक्षात बसवून चाकूचा धाक दाखवून सोनं लुटायचे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक दिवसांपासून लुटीच्या तक्रारी पोलिसांकडे येत होत्या, अखेर पोलिसांच्या तपासाला यश आलं आहे, पोलिसांनी या चोरांना सापळा रचून अटक केली आहे.


 या तिघांची एक टोळी असून या तिघांवर मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. आणखी काही गुन्हे यांनी केले आहेत का, याचा तपास पोलीस घेत आहेत.