कल्याण: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आता लग्न करून लवकरात लवकर पप्पा व्हायला पाहिजे, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले. ते रविवारी कल्याणमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी आठवले यांनी त्यांच्या खास शैलीत राहुल गांधी यांन लग्न करण्याच सल्ला दिला. आठवले यांनी म्हटले की, राहुल गांधी हे आता पप्पू राहिलेले नाहीत. त्यामुळे त्यांनी आता पप्पा होण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले. यापूर्वी गुजरात विधानसभा निवडणुकीवेळी रामदास आठवले यांनी राहुल गांधी यांचे कौतुक करताना त्यांना लग्न करण्याचा सल्ला दिला होता. राहुल गांधी भविष्यात एक चांगले नेते व्हावेत हीच माझी इच्छा आहे. ते अधून-मधुन दलितांच्या घरी जाऊन जेवतात, बसतात त्यांना आपले म्हणतात. त्यांना दलित समाजाबद्दल एवढाच आपलेपणा वाटतो, तर त्यांनी दलित मुलीशी लग्न करून देशासमोर आदर्श ठेवावा. जेणेकरून देशातील जातीव्यवस्था संपुष्टात येण्याच्या प्रक्रियेला चालना मिळेल, असे आठवले यांनी सांगितले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोस्टल रोडच्या श्रेयवादारून सेना-भाजपला चिमटा


तर दुसरीकडे कोस्टल रोडवरून आपापसात भिडलेल्या शिवसेना आणि भाजपलाही त्यांनी चिमटे काढले. कोस्टल रोडचं भूमिपूजन कुणीही केलं असलं, तरी हा प्रकल्प लोकांसाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांनी समजुतदारपणे वागण्याचा सल्ला आठवलेंनी दिला. यावेळी या दोघांचं मनोमिलन आपण करणार का? असा प्रश्न विचारला असता आठवलेंनी म्हटले की, या दोघांच्या मनात एकमेकांबद्दल जलन आहे, पण तरी मनोमिलन होणं गरजेचं असल्याचे त्यांनी सांगितले.