मुंबई : विश्रांतीनंतर दमदार पुनरागमन केलेला वरुणराजा मुंबईतही जोरदार बरसत आहे. परंतु, अद्याप रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीतपणे सुरू असल्याचं निदर्शनास येतंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रात्रभर शहर आणि उपनगरात पावसाची रिपरिप सुरू होती. संध्याकाळी ऐन संध्याकाळच्या वेळी मुंबईत पावसाचा जोर वाढला. दक्षिण मुंबईत पावसाची जोरदार सरी बरसल्या. तर उत्तर मुंबईतल्या बोरिवलीमध्येही पावसानं झोडपून काढलं. त्यामुळे घरी परतणाऱ्या चाकरमान्यांचे पुरते हाल झाले.


सोमवारी सकाळी ९ ते रात्री १० वाजेपर्यंत मुंबई शहरात ५८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली... तर पूर्व उपनगरात ६३ मिलीमीटर आणि पश्चिम उपनगरात ५९ मिलीमीटर पर्जन्यमान नोंदवण्यात आलंय.