मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुन्हा एकदा व्यंगचित्राच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहांवर टीका केली आहे. गुजरातमध्ये झालेल्या निवडणुकांच्या निकालावर राज ठाकरेंनी या व्यंगचित्रातून भाष्य केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्यंगचित्रामध्ये राज ठाकरेंनी विनर पोडियममध्ये मोदी-शहांना पहिल्या क्रमांकावर उभं केलंय तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना दुसऱ्या क्रमांकावर. असं करताना राज ठाकरेंनी राहुल गांधींना मोदी-शहांपेक्षा मोठं दाखवलंय. तसंच जिंकलं कोण आणि हरलं कोण? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.


गेल्या एका महिन्यामध्ये अनेक घडामोडी घडल्या. त्याच्यावरच्या व्यंगचित्राचा अनुशेष शिल्लक होता. अनुशेष शिल्लक ठेवणाऱ्यातला मी नाही. सध्याच्या सरकारचं कर्तृत्वच असं की व्यंगचित्रकारांना विषयांची कमतरता जाणवूच शकत नाही, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.