मुंबई : बाहेरून येणारे लोंढे थांबत नाहीत तोवर मुंबईसारख्या शहरांचा बकालपणा कसा थांबेल? हा सवाल केलाय मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विलेपार्ल्याच्या ब्राह्मण सेवा मंडळात आयोजित प्रकट मुलाखतीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. 


टक्केवारीमुळं रस्त्याची कामं निकृष्ट दर्जाची होतात, खड्डे पडतात. सगळ्या यंत्रणांमध्ये समन्वय नाही, असा भडिमारही राज ठाकरेंनी यावेळी केला. आरक्षणाची भूमिका आपल्याला मान्य नसल्याचं त्यांनी सांगितलं. 


राज ठाकरे एनडीएत सामील होणार का, असा प्रश्न विचारला असता आधी त्यांनी डोळा तर मारू दे, असं मिश्किल उत्तर त्यांनी दिलं.