मुंबई : राज ठाकरेंच्या फेसबूक पेजचं अनावरणं आज झालं. यावेळी बोलतांना त्यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी दाऊद बाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दाऊद इब्राहिमला भारतात स्वतःहून यायचंय, त्याची इच्छा आहे, सध्या त्याच्याशी चर्चा चालू आहे, त्याला भारतात आणून आम्ही ओढून आणल्याचे दावे भाजप सरकार आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर करणार असल्याचं मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.


दाऊदला स्वत:ला भारतात यायचं आहे. त्याची केंद्र सरकारशी सेटलमेंट सुरु आहे असं देखील राज ठाकरेंनी म्हटलं आहे. राज ठाकरेंच्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळात भूकंप झाला आहे. आगामी निवडणुका याच विषयावर भाजप जिंकेल असं देखील राज ठाकरेंनी म्हटलं आहे.