अमोल पेडणेकर, झी मीडिया मुंबई : एलटीटीईचा संस्थापक आणि राजीव गांधींचा मारेकरी व्ही प्रभाकरन यांच्या जयंती दिनाचे फलक झळकावल्याने मुंबईतील मुलुंडमध्ये खळबळ उडाली आहे. प्रभाकरन हा आमचा नेता असून त्याचा जन्मदिवस हा शौर्य जन्म दिवस आहे. त्याला अभिवादन करण्यासाठी नाम तमिळ कच्ची या बॅनरखाली सर्व तमिळ जनतेनं एकत्र यावं अशा आशयाचा हा फलक आहे. यावर नाम तमिळ कच्ची या पक्षाच्या कुठल्याही नेत्याचं नाव नाही. त्यामुळं हा फलक नेमका कोणी लावला याचा शोध पोलीस घेत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसरीकडे शिवसेना नेते शिशिर शिंदे यांनी भर चौकात हा फलक लागणं म्हणजेच गृहखात्याचं अपयश असल्याचा आरोप केला आहे.



स्वतंत्र तमिळ राज्याच्या मागणीसाठी व्ही. प्रभाकरन याने एलटीटी या संघटनेची 1976 साली स्थापना केली होती. 32 देशांनी प्रभाकरनच्या संघटनेला दहशतवादी संघटना घोषित केलं होतं. 18 मे 2009 साली श्रीलंकन सैन्यासोबत झालेल्या चकमकीत प्रभाकरन ठार झाला होता.