मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना मुंबई उच्च न्यायालयानं दिलासा दिला आहे. २०१२मध्ये राज ठाकरेंनी गिरगाव चौपाटी ते आझाद मैदानापर्यंत काढलेल्या मोर्चाप्रकरणी दाखल करण्यात आलेला खटला मुंबई उच्च न्यायालयानं रद्द केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑगस्ट २०१२मध्ये रझा अकादमीनं आझाद मैदानात काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागलं होतं. या मोर्चामध्ये दोन जणांचा मृत्यू तर ४० जण जखमी झाले होते. या जमावानं पोलिसांना मारहाण केली होती. या घटनेच्या निषेधार्थ राज ठाकरेंनी मोर्चा काढला होता. राज ठाकरेंनी परवानगी नसतानाही मोर्चा काढल्यामुळे त्यांच्याविरोधात खटला दाखल करण्यात आला होता.