मुंबई : शिवसेना-भाजप वादामुळे मनसेला भाजपचा पाठिंबा आहे का असा सवाल मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी उपस्थित केला आहे. निरुपम यांनी मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केलेल्या कार्यालयाची पाहणी केली. यानंतर निरुपम यांनी भाजप, मुख्यमंत्री फडणवीस आणि मनसेवर हल्लाबोल केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेस कार्यालयावर हल्ला होऊन २४ तास उलटले तरी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून त्याबाबत साधा निषेध व्यक्त करण्यात आला नसल्याकडे निरुपम यांनी लक्ष वेधले. शिवाय सिनेमांवरुन मनसे आणि मुख्यमंत्री यांच्यात वर्षावर डील झाल्याचा आरोपही निरुपम यांनी केलाय. मनसेचे राजकीय दुकान बंद झाल्याने ते असे हल्ले करत असून आपल्यावर हल्ला झाल्यास त्याला उत्तर देऊ असंही निरुपम म्हणालेत.