मुंबई : बदनाम राणेंच्या कुबड्या कशाला घेता, असा प्रश्न करून युती सरकारच्या त्रिवर्षपूर्तीला शिवसेनेचे ज्येष्ठ मंत्री सुभाष देसांनी सरकारवर टीकास्त्र सोडलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंत्रिमंडळ विस्तारात नारायण राणेंच्या पुनरागामनामुळे सध्या कात्रीत सापडलेली सेना सरकारवर टीकेची एकही संधी सोडत नाहीये.


सिंचन घोटाळ्याविरोधात भाजपनं आवाज उठवला पण आता चौकशी मात्र धिम्यागतीनं सुरू आहे, असं सुभाष देसाईनी म्हटलंय. युती तात्विक मुद्द्यावर आहे. जितका काळ जमेल तितका काळ सत्तेत राहू अन्यथा टाटा बाय बाय करू असंही देसाईंनी स्पष्ट केलयं.



राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारला आज तीन वर्ष पूर्ण झाली. ३१ ऑक्टोबर २०१४ ला देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांची शपथ घेतली तेव्हा शिवसेना सत्तेत सहभागी नव्हती. पण नंतर २०१४ च्या डिसेंबरमध्ये शिवसेना सरकारमध्ये सामील झाली.