मुंबई : कर्जमाफीची घोषणा करून दोन महिने उलटले तरी शेतक-यांनी प्रत्यक्षात कर्जमाफीचा लाभ झालेला नाही. यासंदर्भात शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन कर्जमाफीची रक्कम तातडीनं देण्याची मागणी केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी शेतक-यांना कर्जमाफीची रक्कम ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मिळणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय. शेतक-यांना तातडीनं कर्जमाफी मिळावी यासाठी शिवसेनेच्या शिष़्टमंडळानं मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.


दिवाळीची वाट न पाहता तातडीनं कर्जमाफीची रक्कम देण्याची मागणी शिवसेनेनं केली. शेतक-यांना लगेचच मदत मिळाली तर आत्महत्या थांबतील असा विश्वास शिवसेना मंत्र्यांनी व्यक्त केलाय.