मुंबई : २०१९च्या निवडणुकांची रणनीती ठरवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलीवली होती. शिवसेना भवनात झालेल्या या बैठकीला दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईमधले सर्व पदाधिकारी, आमदार, खासदार आणि नगरसेवक या बैठकीला उपस्थित होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या बैठकीनंतर लोकसभा आणि राज्यसभा निवडणुका एकत्र होण्याबाबत खासदार अरविंद सावंत यांनी साशंकता दर्शवली. निवडणूक आयोगाची विधानं रोज बदलत असल्यामुळे याबाबत शंका असल्याचं ते म्हणाले.