मुंबई : शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारी वाढल्याचे दिसून येत आहे. काल रात्री मुंबईच्या वांद्रे भागात नंग्या तलवारी आणि धारधार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याचे एकच खळबळ उडाली. वांद्रे येथील जेजे कॉलनीत राहणाऱ्यांवर 7 ते 8 अज्ञात इसमांनी तलवारी, चाकू अशा धारदार शस्त्राने हल्ला केला. (Sword and sharp weapon attack in Mumbai, attack on 7 people in Bandra colony)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


ही घटना घडली तेव्हा जे. जे कॉलोनीतील काही जण जेवणानंतर, घराबाहेर आले आणि बोलण्यासाठी एकत्र जमले. त्याचवेळी 7 ते 8 अज्ञात लोकांनी कॉलनीतील एकूण 7 जणांवर नंग्या तलवारी आणि चाकूने हल्ला चढवला. काहींना मानेवर तलवारीचे घाव घातले. यात काही जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.


पीडितांच्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, हल्लेखोर अज्ञात लोक होते. हल्लेखोर आणि पीडित लोकांमध्ये कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. या लोकांवर हा हल्ला कोणी आणि का केला हे पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांना अद्याप समजू शकलेले नाही. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.


 या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार संबंधित व्यक्तीची या संपूर्ण प्रकरणाबाबत चौकशी सुरु आहे. पोलिसांनी भादंवि कलम 7०7 आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून असे सांगण्यात आले आहे की, यावेळी हल्ला कोणी केला आणि कोणत्या कारणास्तव, हे अद्याप स्पष्ट झाले नाही, परंतु लवकरच ते या प्रकरणातील उलगडा केला जाईल, अशी माहिती एसपी वसंत पिंगळे यांनी सांगितले.