मुंबई :  मुंबई आणि दिल्ली यांच्यादरम्यान टी-२०चा सामना झाला. मात्र, या सामन्यात मुंबईचा पराभव झाला. परंतु हार्दिक पांड्याने एक जबरदस्त कॅच पकडला आणि सर्वांनाच हैरान करुन सोडले. मुंबई आणि दिल्लीसाठी हा सामना महत्वाचा होता. दोघांनाही हा सामना जिंकणे गरजचे होते. मात्र, दिल्लीने या सामन्यात बाजी मारली. आपले स्थान टिकविण्यासाठी आणि चांगल्या फरकाने जिंकण्यासाठी दोन्ही संघाना हा सामना जिंकणे महत्वाचे होते.


टी-२० सामन्यात जोरदार टक्कर पाहायला मिळत आहे. मात्र, मुंबईने सामना गमावला असला तरी हार्दिक पांड्याचा झेल अफलातून होता. त्याने सीमारेषेवर धावत जाऊन छान झेल टिपला. त्यामुळे हार्दिकवर कौतुकाचा वर्षाव  होत आहे.