ठाणे : ठाण्याच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची तारांबळ उडली आहे. या दिशेने येणारी वाहतूक पुर्णपणे ठप्प झाली आहे. ही वाहतूक पूर्वपदावर येण्यास साधारण १ तास तरी जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.  ओव्हरहेड वायर तुटल्याने  वाहतूकीवर परिणाम झालाय.   ठाणे-ऐरोलीदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांचा घोळ झालाय. नेहमीप्रमाणे ऑफिसल्या जाणाऱ्यांची जास्त गर्दी नसली तरी मोठ्या प्रमाणात प्रवाशांचा खोळंबा झालाय.