मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणा-या तलावांपैकी तुळशी तलाव देखील सोमवारी सकाळी भरून वाहू लागलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधी मोडक सागर आणि तानसा तलाव भरले होते. आता त्यापाठोपाठ तुळशी तलावही भरून वाहू लागल्यानं मुंबईकरांची पाण्याची चिंता थोडी कमी झालीय. 


मुंबईला पाणीपुरवठा करणा-या तलावांमध्ये 85 टक्के पाणीसाठा असल्याचं समजतंय. अप्पर वैतरणा, भातसा आणि मध्य वैतरणा हे तलाव अजून भरलेले नाहीत.