मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या सगळ्या खासदारांची बैठक घेतली. वर्षा बंगल्यावर झालेल्या या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी शिवसेना खासदारांची मत जाणून घेतली. राजकीय प्रादूर्भाव होणार नाही, कारण आम्ही फवारणीचे पंप घेऊन फिरत आहोत. आमचं सरकार ५ वर्ष टिकेल आणि उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री राहतील, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या बैठकीनंतर दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेले आहेत. त्याच्याशी आमच्या बैठकीचा काहीही संबंध  नाही. राजकीय घडामोडी काहीही सुरू नाहीत. सबकुछ आलबेल है...और आलबेल रहेगा. हे सरकार ५ वर्ष चालेल आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच राहतील, असं संजय राऊत म्हणाले.


कोकणामध्ये गणपती उत्सवाबाबत काय भूमिका घ्यावी, यावरही चर्चा झाली. बऱ्याच कालावधीनंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला आहे. शिवसेनेचे खासदार एकत्र आले. चर्चेचा मुख्य विषय कोरोनाच्या उपाययोजना होता, असं संजय राऊत यांनी सांगितलं.