मुंबई : गेल्या 24 तासांत मुंबईला पाणी पुरवठा करणा-या सात तलावांत तब्बल 1 लाख 16 हजार दशलक्ष लीटर पाणीसाठा वाढलाय. आता एकूण पाणीसाठा 9 लाख दशलक्षांवर पोहचला. 62 टक्के तलाव भरलेयत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिक, पालघर,परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असल्यानं तानसा, मोडकसागर, भातसा, अप्पर वैतरणा आणि मध्य वैतरणा तलावातील पाणी पातळीतही वाढ झालीय. 


सकाळीच मोडकसागर धरणही ओव्हरफ्लो झालंय. इतरही तलाव भरण्याच्या मार्गावर आहेत. सर्व तलावांत एकूण 14 लाख 47 हजार दशलक्ष लीटर साठवण क्षमता आहे.