मुंबई : मुंबई विद्यापीठाचा सावळा गोंधळ सुरूच आहे. तब्बल ९० दिवसांच्या प्रतिक्षेनंतर लॉच्या विद्यार्थ्यांना आज निकाल पाहता आला. मात्र त्यातही शेकडो विद्यार्थ्यांना नापास दाखवण्यात आलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इतकंच नाही तर गेल्या सेमिस्टरमध्ये टॉपर असणा-या विद्यार्थिनीला गैरहजर दाखवण्यात आलंय. हे सर्व विद्यार्थी गव्हर्नमेंट लॉ कॉलेजचे आहेत. २०० ते २५० विद्यार्थ्यांना परीक्षेला बसूनही गैरहजर दाखवण्यात आलं आहे. तर अनेक विद्यार्थ्यांना नल अॅण्ड व्हॉईड असा निकाल आला आहे.