मुंबई : रोजच्या जेवणात भाताचे महत्त्व अधिक आहे. पोळी-भाजीसोबत भात हा खाल्ला जातोच. तांदूळ शिजवून भात केला जातो. मात्र ज्याप्रमाणे जेवणात भाताला महत्त्व आहे त्याचप्रमाणे तांदुळाचे अनेक फायदेही आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेहऱ्यावरील डाग दूर होतात - चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी उपयोगी आहे तांदूळ. तांदूळ बारीक वाटून घ्या. वाटलेल्या तांदुळाच्या पिठीमध्ये थोडेसे पाणी मिसळून ही पेस्टर चेहऱ्यावर हलक्या हाताने लावा. यामुळे चेहऱ्यावरील डाग दूर होतात. 


डोकेदुखीसाठी फायदेशीर - डोकेदुखीचा त्रास होत असल्यास शिजलेल्या भाताच्या पाण्यात एक चिमूट सुंठ पावडर मिसळून डोक्यावर लावा. यामुळे डोकेदुखीपासून सुटका होते. 


जुलाबाचा त्रास होतो दूर - जुलाबाचा त्रास होत असल्यास तांदूळ बारीक वाटून घेऊन ते पाण्यात उकळवा. यात मीठ टाकून ही पेज प्या. यामुळे जुलाबाचा त्रास कमी होतो. 


सतत तहान लागणे - सतत तहान लागत असेल तर तांदुळाचे दाणे दिवसातून दोन-तीन वेळा चावून चावून खा. यामुळे तहान लागणे कमी होते.