जम्मू : सीमेवर गेल्या काही दिवसांपासून तणाव आहे. यातच आता आर्मी चीफ जनरल दलबीर सिंह सुहाग यांनी आज LoC वर सीमा भागावरील सुरक्षेचा आढावा घेतला. याभागात त्यांनी जवानांना अलर्ट आणि आक्रमक राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. यादरम्यान ते उधमपूर येथे देखील गेले आणि त्यांनी तेथे जवानांची भेट घेतली.


पाकिस्तान व्याप्त कश्मीरमध्ये भारतीय सेनेकडून सर्जिकल स्ट्राईक झाल्यानंतर LoC वर तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. पाकिस्तानी सेनेने १४ नोव्हेंबरला म्हटलं होतं की, भारतीय सेनेच्या फायरिंगमध्ये त्यांचे ७ जवान मारले गेले. पाकिस्तानच्या या वक्तव्यानंतर जवानांना प्रतिकूल परिस्थितीशी लढण्यासाठी तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.