नवी दिल्ली : पश्चिम बंगाल आणि आसाम विधानसभा निवडणुकीसाठी दुस-या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झालीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आसामच्या एकूण १२६ जागांपैकी उरलेल्या ६१ जागांसाठी मतदान होत आहे. आसाममध्ये दुस-या टप्प्यात ५२५ उमेदवार रिंगणात आहेत. इथं काँग्रेसला पराभवाची धूळ चारत आसाममध्ये सत्ता स्थापन करण्याचे भाजपचे मनसुबे आहेत.


तर दुसरीकडे पश्चिम बंगालच्या पश्चिम मिदनापूर, बांकुरा, वर्धमान या जिल्ह्यासह एकूण ३१ जागांसाठी मतदान होत आहे. इथं दुस-या टप्प्याच्या मतदानात विरोधी पक्षातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांचा फैसला होणार आहे..