शामली(उत्तरप्रदेश) : निवडणुकीनंतरच्या विजयाचं सेलिब्रेशन एका निष्पाप मुलाच्या जीवावर बेतलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेशच्या शामलीमध्ये संध्याकाळी स्थानिक निवडणुकांचे निकाल घोषीत झाले. त्यावेळी सपा उमेदवाराचा विजय झाल्यामुळे कार्यकर्ते जल्लोष करत होते. जल्लोषाचा भाग म्हणून काही अतीउत्साही कार्यकर्त्यांनी गोळीबार केला.


यातली एक गोळी रिक्षेतून जाणाऱ्या एका आठ वर्षाच्या मुलाला लागली, या गोळीबारामध्ये मुलाचा मृत्यू झाला आहे. समीर असं या मुलाचं नाव आहे. गोळी लागल्यावर त्याला रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केलं.