कोलकाता : पाच राज्यांतल्या निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेस नेतृत्व किती असुरक्षित झालंय, याची चूणूक दाखवणारी बातमी. निवडणून आलेल्या आमदारांकडून लेखी निष्ठा घेतली आहे.


पराभवानंतर फर्मान


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतर आता काँग्रेसनं एक विचित्र फर्मान जारी केलंय. त्यानुसार पश्चिम बंगालच्या सर्व आमदारांनी १०० रुपयांच्या स्टँप पेपरवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या प्रति असणाऱ्या निष्ठेची ग्वाही लिहून दिले आहे.


पक्षविरोधी कारवाया करणार नाही


विधानसभेत सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या प्रती निष्ठा ठेवू. पक्षविरोधी कारवाया करणार नाही. इंडियन काँग्रेसचे यापुढे काम करीत राहिन, असं आमदारांकडून बॉन्ड पेपरवर लिहून घेण्यात आले आहे.