नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून भारत माता की जय म्हणण्यावरुन देशभरात वादंग सुरु आहे. या वादात आता दारुल उलुम देवबंदनेही उडी घेतलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुस्लिम लोकांनी भारत माता की जय! म्हणू नये असा फतवा देवबंदने काढलाय. ज्याप्रमाणे वंदे मातरम बोलू शकत नाही त्याप्रमाणे भारत माता की जय म्हणू शकत नसल्याचा देवबंदने फतवा काढलाय. 


माणूसच माणसाला जन्म देऊ शकता. त्यामुळे धरती आई कशी होऊ शकते. मुसलमान अल्लाशिवाय कोणालाही देव मानत नाही तर भारताला देवी म्हणून कसे मानणार? आमचे देशावर प्रेम आहे. मात्र ईश्वर एक आहे यावर आमचा विश्वास आहे, असे दारुल उलुमने म्हटलेय.


याआधीही स्वातंत्र्यदिनी मुस्लिमांनी आपल्या घरावर तिरंगा फडकवावा असा फतवा जारी केला होता.