अकलूज : सहकारामुळेच सर्वांगीण विकास होत असल्याचं मत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केलंय. अकलूज इथं सहकार महर्षी शंकरराव जन्मशताब्दी वर्ष कार्यक्रमानिमित्त ते बोलत होते.


उत्पन्नाची साधने आणि त्यात समाजाने योगदान दिले तर सर्वसामान्यांच्या आयुष्यात बदल होईल असं रेल्वेमंत्र्यांनी म्हटलंय. तर देशात पाण्याचा प्रश्न गंभीर असून तो सोडवल्याशिवाय शेतक-यांचा विकास होणार नसल्याचंही सुरेश प्रभू यांनी म्हटलं आहे.