कलबुर्गी : कर्नाटकातील अपघातात महाराष्ट्रातील ८ भाविक ठार झाले आहेत, हे भाविक उस्मानाबाद जिल्ह्यातील आहेत. गुरुपोर्णिमेच्या निमित्ताने गाणगापूरला दर्शनासाठी निघालेल्या महाराष्ट्रातील भाविकांवर मंगळवारी काळाने घाला घातला.  


ट्रक आणि क्रूझरची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात ८ जणांचा जागीच मृत्यू झाला. 
 
 हे भाविक आज गुरुपोर्णिमा असल्याने दर्शनासाठीगाणगापूरला निघाले होते. कलबुर्गी जिल्ह्यातील आळंद गावाजवळ अपघात झाला. अपघातातील जखमींना कलबुर्गी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.