नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पाकिस्तानावर टीका केल्यानंतर आज संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनीही पाकिस्तानवर जोरदार टीकास्त्र सोडले. पाकिस्तानात जाणे म्हणजे नरकात जाण्यासारखे आहे अशा तिखट शब्दात त्यांनी पाकिस्तावर टीका केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमवारी देश स्वातंत्र्याच्या रंगात रंगत असताना दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये हल्ला केला. या हल्ल्याला भारताच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. या कामगिरीबद्दल पर्रिकर यांनी जवानांचे कौतुक केले. 


'काल आमच्या जवानांनी पाच दहशतवाद्यांना माघारी धाडले. पाकिस्तानात जाणे आणि नरकात जाणे एकसारखेच आहे. पाकिस्तान दहशतवादाला प्रोत्साहन देत आहे', असे पर्रिकर यावेळी म्हणाले. 


याआधी आमचे जवान दहशतवादाला प्रत्युत्तर देण्यासाठी आदेशाची वाट पाहायचे मात्र आता आम्ही जवानांना आदेश दिलेत की शत्रूच्या एका गोळीचे उत्तर 10 गोळ्यांनी द्या, असेही पर्रिकर पुढे म्हणाले.