नवी दिल्ली : गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शेजारील देश पाकिस्तानला एक प्रस्ताव पाठवला आहे. राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे की, 'जर पाकिस्तानची इच्छा असेल तर आम्ही त्यांच्या देशातील दहशतवाद्यांना संपवण्यासाठी त्यांना मदत करु शकतो. त्यांनी म्हटलं आहे की, आम्ही पाकिस्तानी सेना आणि लोकांच्या विरोधात नाही आहोत.'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गृहमंत्र्यांनी म्हटलं की, 'आज पाकिस्तानची स्थिती अशी आहे की, ते दहशतवाद आणि फ्रीडम फाइटर यांच्यामधील अंतर विसरले आहेत. पाकिस्तानसंबंधित आपण चर्चा करतो की, ते स्टेट अॅक्टर्स आहे की नॉन स्टेट अॅक्टर्स आहे पण मला वाटतं की हे सर्व तर्क पोकळ आहेत. पाकिस्तानची संपूर्ण मशीनरी भारतात दहशतवादाला हवा देण्य़ाच्या कामात लागली आहे.'


राजनाथ सिंह यांनी हे देखील म्हटलं की, 'पाकिस्तानची हालत अशी नाही आहे की ते दुसऱ्याचं भलं करु शकतील. त्यांना कोणाचचं चांगलं दिसत नाही आणि समजत ही नाही.'