नवी दिल्ली : उरी येथील लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याची ताकद लष्करामध्ये आहे. मात्र त्याची वेळ आणि ठिकाण आम्ही ठरवणार, असे डीएमओ लेफ्टनंट जनरल रणवीर सिंह यांनी म्हटलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कालपासून सुरु असलेले ऑपरेशन आज सायंकाळी संपले. सर्च ऑपरेशनमध्ये मोठ्या प्रमाणात खाद्यसामान मिळाले. तसेच ४ रायफल, ३९ ग्रेनेड, २ रेडिओ सेटही ताब्यात घेण्यात आले. 


रविवारी उरी येथील लष्करी तळावर दहशतवादी हल्ला केला. यात १८ जवान शहीद झाले. तर अनेक जण जखमी झाले.