नवी दिल्ली : भारतानं पाकिस्तानातल्या आपल्या दूतावासातील कर्मचाऱ्यांच्या मुलांना मायदेशी परत पाठवण्याचे आदेश जारी केले आहेत. काश्मीर खोऱ्यात गेल्या काही दिवसात निर्माण झालेली तणाव पूर्ण परिस्थिती आणि पाकिस्तानकडून त्याविषयी आलेल्या प्रतिक्रियांच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र खात्यानं हे निर्देश दिले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इस्लामबादमध्ये शिक्षण घेणाऱ्या भारतीय कर्मचाऱ्यांच्या मुलांना शाळांमधून काढून दिल्लीला परत पाठवावं असे निर्देश देण्यात आलेत. सध्या इस्लामाबादच्या शाळांमध्ये ५० भारतीय मुलं शिक्षण घेत आहेत. दरम्यान पाकिस्तानकडूनही भारताला प्रत्युत्तर दिलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.