जयपूर : झालावाड येथील राहणारा दुर्गेश गौतम याचं लग्न पर्यावरण वाचवण्याचा संदेश देऊन गेली. या विवाह सोळळ्यात प्रत्येक पाहुणा हा सायकलवर आला एवढंच नाही तर स्वत: नवरदेव सुद्धा सायकलवर आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रत्येकाच्या शर्टवर go green theme चे स्टिकर लावले होते. त्यामुळे याचं प्रत्येकाकडूनच कोतूक झालं. 


गिफ्टमध्ये नातेवाईकांनी देखील झाडेच दिली. लग्नात प्रत्य़ेकाने झाडांचं रक्षण करण्याचा संकल्प देखील केला. साखरपुड्यात मुलाने मुलीला हिरव्या रंगाची अंगठी घातली. 


लग्नाचा स्टेज देखील हिरव्या झाडांनी रंगला होता. वधू-वराने सात फेरे देखील ७ झाडांच्या भोवतीच घातले.  लग्नात आलेल्या प्रत्येक स्त्रीने हिरव्या रंगाची साडी परिधान केली होती. 


लग्नाच्या माध्यमातून पर्यावरण वाचवण्याचा अनोखा संदेश देण्यात आला.