नवी दिल्ली : गृह मंत्रालयाच्या सूत्रांच्या माहितीनुसार मोठी बातमी काश्मीर खोऱ्यातून येत आहे. तब्बल २५० दहशतवादी हे काश्मीर खोऱ्यामध्ये घुसल्याची माहिती येत आहे. सर्जिकल स्ट्राईक आधीही यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला आहे.


भारतीय लष्कराला याची माहिती मिळताच सेना हायअलर्टवर आहे. काश्मीरी खोऱ्यात मोठ्या प्रमाणात सर्च ऑपरेशन सुरु झालं आहे. गृहमंत्रालयाने सगळ्या राज्यांना सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सूचना पाठवल्या आहेत. भारतीय लष्कर पूर्णपणे तयार आहेत. शत्रूंना चोख प्रत्त्यूतर देण्यासाठी सज्ज असल्याचं भारतीय जवानाने म्हटलं आहे.