लखनऊ : उत्तर प्रदेशमधील समाजवादी पक्षाच्या पराभवासाठी कुणीही जबाबदार नाही किंवा यामागे कुठलंही कारण नाही असं वक्तव्य मुलायमसिंह यादव यांनी केलं आहे.


भाजपनं मोठमोठी आश्वासनं देऊन सत्ता मिळवली असून त्या आश्वासनांची ते पूर्तता करतात की नाही हे पाहावं लागेल असंही ते म्हणालेत. तसंच राजकारणात जय पराजय होत असतात, त्यामुळे होळीनंतर पराभवाची समीक्षा करण्यात येईल असंही मुलायम यांनी म्हटलंय.