नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टोलमाफीला आणखी मुदत वाढ दिली आहे. त्यामुळे 24 नोव्हेंबर मध्यरात्रीपर्यंत टोलमाफीतून वाहनचालकांची सुटका झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रीय महामार्गांवर टोलमाफीची मुदत वाढवण्यात आली आहे. अजून आठ दिवस म्हणजे 24 नोव्हेंबरपर्यंत टोल लागणार नसल्याची माहिती केंद्रीय रस्तेवाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिली.


यापूर्वी 18 नोव्हेंबरपर्यंत टोलमाफी देण्यात आली होती. नोटाबंदीच्या निर्णय़ामुळे सुट्या पैशांची समस्या निर्माण झाली असल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे.