पणजी : भारतीय लष्करानं केलेल्या कारवाईमुळे पाकिस्तानचं धाबं दणाणलं आहे. ही कारवाई थांबवण्यासाठी पाकिस्ताननं फोन केल्याचा गौप्यस्फोट संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंगळवारी पाकिस्ताननं सीमारेषेवर केलेल्या गोळीबारामध्ये भारताचे तीन जवान शहीद झाले. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्करानं पूँछ, राजौरी, माचिल सेक्टरवर असलेल्या पाकिस्तानी चौक्यांवर हल्ले केले. या हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून फोन आला असल्याचं पर्रिकर म्हणाले.


पाकिस्तानवर हल्ले करण्यात आम्हाला रस नाही पण पाकिस्ताननंही असे हल्ले करू नयेत असं त्यांना सांगण्यात आलं. यामुळे दोन दिवस भारत-पाकिस्तान सीमा शांत आहे, असं वक्तव्य पर्रिकर यांनी केलं आहे.