वाराणसी : राहुल गांधी जेव्हापासून बोलायला लागले याचा आनंद आहे, युवा नेता बोलला नसता तर देशात भूकंप झाला असता अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी उपरोधिक टोला लगावला आहे. राहुल गांधींनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचीही मोदींनी जोरदार खिल्ली उडवली.


वाराणसीमध्ये आयोजीत सभेत मोदींनी राहुल गांधींसह नोटाबंदीचे विरोधक आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावरही जोरदार निशाणा साधला. नोटाबंदीला विरोध करणाऱ्याचा समाचार घेताना मोदींनी त्यांची तुलना पाकिस्तानशी केली. नोटा बंदीच्या त्रासातून जाणाऱ्या सव्वाशे कोटी जनतेला प्रणाम करतो असंही मोदी म्हणाले.