नवी दिल्ली : गांधी हत्येवरून संघावर टीका करणाऱ्या राहुल गांधींनी घुमजाव केलं आहे. मी माझ्या वक्तव्यावर ठाम असल्याचं राहुल गांधी म्हणाले आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीवेळी भिवंडीमधल्या प्रचारसभेत राहुल गांधींनी गांधी हत्येवरून संघाला लक्ष्य केले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याप्रकरणी राहुल गांधींविरोधात भिवंडीमध्ये मानहानीचा दावा दाखल करण्यात आला होता. हा दावा रद्द करण्यासाठी राहुल गांधींनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. गांधी हत्येवरून आपण संघाला बदनाम केलं नसून संघाशी संबंधित व्यक्तीवर आरोप केल्याचं राहुल गांधी म्हणाले होते. 


या वक्तव्यामुळे राहुल गांधींनी घुमजाव केल्याची टीका करण्यात येत होती. आता पुन्हा एकदा राहुल गांधींनी संघाबाबतच्या वक्तव्यावर ठाम असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. समाजात द्वेष पसरवणाऱ्यांविरोधात लढणं मी थांबवणार नसल्याचंही राहुल गांधी म्हणाले आहेत.