कथुआ : वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन कुरापती काढणाऱ्या पाकिस्तानला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी कडक शब्दात सुनावलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जम्मूच्या कथुआ येथील शहीद दिवसाच्या निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी पाकिस्तानवर कडाडून टीका केली. भलेही पाकिस्तानने 4-4 वेळा भारतावर हल्ला केला असला तरी आमच्या जवानांनी नेहमीच त्यांना लढाईत हरवले आहे. 


पाकिस्तानला हे समजलं पाहिजे की दहशतवाद हे निडर लोकांचे हत्यार नाही तर दुबळ्या लोकांचे हे हत्यार असते. कारगिल युद्धात पाकला पराभव सहन करावा लागलाय. त्यामुळे त्याला समजलंय की पाक भारताला सरळ पराभूत करु शकत नाही. म्हणूनच तो असे छुपे मार्ग अवलंबतोय, अशा शब्दात त्यांनी पाकिस्तानवर टीका केलीये.