नवी दिल्ली : सर्वसामान्य बजेटशिवाय आणखी पाच हजार कोटी द्या अशी मागणी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे केलीय.. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची दिल्लीत भेट घेतली. केंद्राच्या बजेटआधी सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांची बैठक नवी दिल्लीत पार पडली. यावेळी त्यांनी ही मागणी केली. 


भाजपने निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी आणि इतर विकास प्रकल्पांसाठी निधीची आवश्यकता असल्याचे मुनगंटीवारांनी सांगितलंय.. 


शेतक-यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काही योजना प्रस्तावित करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केलीय. तसेच गोसीखुर्द प्रकल्पाला मदत करण्याचीही मागणीही त्यांनी केलीय..