कानपूर : उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे 18 जवान शहीद झाले. उरीमध्ये झालेला हा हल्ला वेदनादायक असल्याची प्रतिक्रिया भारताचा टेस्ट टीमचा कॅप्टन विराट कोहलीनं दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रत्येक भारतीयाप्रमाणे मलाही या हल्ल्याचं दु:खं झालं आहे. हे हल्ले कसे थांबवावेत किंवा तोडगा कसा काढावा हे सांगायला मी काही तज्ज्ञ नाही, पण जे जवान शहीद झाले त्यांना मी श्रद्धांजली वाहतो. या शहीद जवानांच्या कुटुंबाच्या दु:खात मी सहभागी आहे, असं कोहली म्हणाला. ही प्रतिक्रिया देताना विराट कोहली हळवा झाला होता.


पाहा काय म्हणाला कोहली